Skip to main content

शेख_चिल्ली- ज्याची जशी कर्म तस त्याच नाव


#
पूर्वी आमच्या शेजारी एक दिल्लीहुन आलेलं कुटुंब पूर्वी  मुंबईत आलेलं राहत होत त्यात एक आज्जी तिची सून मुलगा दोन नातू एक नात रहात होती
त्या आज्जीला आपल्या मुलाबाळांची छान नाव असताना देखील विचित्र नावाने हाक मारायची सवय होती मोठ्या नातीला लडकन, नातवाला लड्डू, दुसऱ्याला टेडया,,, आशा विचित्र नावाने हाक मारत असे न पटून एक दिवस हिम्मत करत त्या आजीला मी सहज विचारलं आजी इतकी छान छान नाव आपल्या नातवांची तुम्हीच ठेवली असतील ना???
तस आज्जीने मला जवळ घेतलं आणि केसांवरून हात फिरवत सांगितलं
*बरोबर बोलतोस पण ज्याची जशी कर्म तस त्याच नाव*
आता बघ ही सुनीता तू ओळखतोस तुझ्याच वर्गात आहे ना? तू बघतोस ही बसल्या बसल्या कुठेही लुडकते ( झोपते) आणि हा अनिलकुमार काही विचारले तर कधी सरळ बोलतच नाही नेहमी वाकडच ( टेढा) बोलतो, आणि हा अजय बघितलास ना किती खादाड आहे आणि लाडू बघितलं तर पंचपक्वांनाच ताट देखील बाजूला सारेल (लड्डू )
अरे जस नाव आहे तसेच वागावं नाही तर त्या नावाला अर्थ प्राप्त होतो कुुणी पप्पू तर कुुणी फेकू थांब आज खऱ्या #शेख_साहेबांची गोष्ट सांगते ऐक, तर हे शेख साहेब शाळेत कधी नीट जात नसत त्यांचा व्यवसाय ( भंगार वैगेरे ) करण्यावरच जोर असे जे मिळेल जस मिळेल ते कधी रस्त्यावर कधी घरोघरी तर कधी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा,बिसलेरी, बिस्कीट ,शाळा सोडून काहीबाही विकण्यातच यांचा दिवस जात असे आई वडील कुठून कुठून पकडून आणून वर्गात बसवत पण या शेख साहेबांचं लक्ष बाहेरच असे, त्यामुळे काय शिकवतात या कडे कधी त्याच लक्ष नसे मग अधर्वट कानावर पडे ते तो कसे बसे लक्षात ठेवत असे त्या दिवशी वर्गात स्त्रीलिंगी पुल्लिंग शिकवत होते अर्थातच शेख साहेबांचं लक्ष नव्हते
गुरुजी शिकवत होते ,
सलमान रोता है
सलमा रोती है
सलमान  खाता है
सलमा खाती है,,, पण शेख साहेब ?? त्यांचे डोळे आणि डोकं वर्गाबाहेरच भिरभिरत होते,,
झालं थोड्या शाळा सुटली सर्वात आधी शेख साहेब बाहेर पडले आणि गेले खेळत खेळत दूर आणि अचानक एका मुलीचा ओरडण्याचा आवाज त्याला ऐकू आला,,, बघितलं  तर मुलगी एका विहिरीत पडली होती आणि मदती साठी आवाज देत होती
झालं ते बघितल्यावर शेख साहेबांनी धावत जाऊन
गावकऱ्यांना गोळा करून त्यांच्या मदतीने तिला बाहेर काढलं पण यात गम्मत अशी झाली होती की अर्धवट शिक्षण घेतलेल्या शेखने गावात लोकांना बोलवताना ,, *अरे कुवे मे लडकी गिरी है वो मदत के लिये #चिल्ली रही हे* अस वारंवार बोलत होता लोकांना त्याकडे दुर्लक्ष करत मुलीला बाहेर काढलं पण मग मात्र नंतर त्याला विचारलं की तू अस का बोलत होतास की *लडकी चिल्ली रही है?*
त्यावर मोठी फुशारकी मारत शेख साहेब बोलले
*अरे भाई पढा लिखा हु तुम सब जैसा गवार थोडी हु लाडका होता तो #चिल्ला था तो लडकी है तो #चिल्ली ही रहेगी ना?
असल्या अर्धवट रावांचं नाव पुढे शेखचिल्ली झालं
आजही आजूबाजूला निरखून पाहिलं आणि डोळे आणि मेंदू जागा ठेवला असले अर्धवट राव आज आपल्यावरच राज्य करताना दिसतील
शेवटी शेखचिल्ली स्वप्न म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हे ठरलेलंच ज्यांच्या आधारावर त्यांच्यावरच कुर्हाड चालवली की फांदी किती काळ सांभाळून घेणार शेवटी येरे माझ्या मागल्या
मतदार त्या फांदीसारखेच तुम्हा किती सहन करणार?

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल