Skip to main content

बार बार देखो -जबाबदारी आणि हवेपण यात ब्यालेंस साधायला चुकलो कि ,,,

बार बार देखो -जबाबदारी आणि हवेपण यात ब्यालेंस साधायला चुकलो  कि ,,,
किमान एकदा तरी नक्कीच पाहावा
असा चित्रपट,,,
एकदा अशा साठी कि चित्रपट पाहताना गोंधळ उडतो कि नक्की
काय चालले आहे तेच पटकन लक्षात
नाही
परंतु जेव्हा आशय लक्षात येतो तेव्हा स्वतःच अपराधी पण झाकताना नाकी नऊ येईल हे नक्की,,
चित्रपट थोडा चमत्काराकडे झुकणारा आहे आणि त्या चमत्काराचा फायदा डायरेक्तटर ने उत्तम घेतला आहे,, कारण तो चित्रपट आहे त्यातच अस घडू शकत,,,
साधी सोपी कथा थोडी जास्तच गुंतागुंत करून सागितली आहे ,,,
सिद्धार्थ आणि कतरिना दोघ हि लहान पानापासून चे मित्र
कतरिना भावूक प्रेमवेडी तर सिदार्थ थोडा भिडस्त लाजरा बुजरा
पण अभ्यासात हुशार ,,
कालांतराने  मोठे होतात त्याच बरोबर त्यांची स्वप्न देखील मोठी होत जातात
आणि अशाच एका अवघड क्षणी कत्रिना सिदार्थ ला लग्ना बद्दल विचारते
आणि त्याचा होकार गृहीत धरते ,,
आणि दोन्ही घरात लग्नाची एकच धूम उडते ,,
कतरिना तर स्वप्नातच जाते सगळी कडे एका आनदाने नाचत बागडत असते
आणि सिदार्थ ला केम्ब्रिज विद्यापीठातून फोन येतो त्याच्या कामा बाबत तिकडे बोलवल जात
आता हिरोच आणखी गोंधळ उडतो तिकडे जावू कि लग्न करू ?
आता उद्या लग्न होणार असत आणि त्याला हे सारे प्रकरण ज्याची
थोडी थोडी मजा तोही घेत असतो ते त्याला अचानक जड वाटू लागत ,,
आणि त्यातच वादळा सारखी ती त्याला आपल्या गाडीत बसवते आणि बापाने दिलेलं नाव घर
त्याला दाखवायला नेते ,,
आणि इथे त्याच्यातला एक क्याल्क्युलेतटेड आयुष्य जगणारा हिरो जागा होतो
तो हे सगळ नाकारतो त्याला हे सार हव तर असत पण त्याची जबादारी नको असते 
जबाबदारी आणि हवेपण यात ब्यालेंस साधायला चुकतो 
हिरोईन बिचारी रडत रडत आपल्या घरी निघून जाते ती घेल्यावर मात्र आपण काय करून बसलो
या विचारात तो दारू पितो आणि इथेच चमत्कार दाखवण्याच्या नादात थोडा गोंधळ उडतो 
लग्नाच्या आदल्या दिवशी जो ब्राम्हण त्याच लावणार असतो त्याच्यशी तो वाद घालतो 
काय हे सारे फालतू आहे आणि हे सार पटापट करा माझ्या कडे वेळ नाही 
आणि अशा  तर्हेने लग्न करून काय होत हि अशी किती तरी लग्न अयशस्वी होतात
वैगेरे वैगेरे ,,,
भटजी  त्याच्या पद्धतीने लग्न म्हणजे काय  ते सात फेरे म्हणजे काय ते सांगतो 
आणि त्याच वेळी त्याच्या हाताला एक गंडा  बांधतो 
आणि इथे घरी दारू पिल्या नंतर धुंदी चढते
आणि त्यात त्याला पुढील साथ वर्षात काय घडू शकत
जर आपण बायकोला गृहीत धरल तर तिच्या खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे
दुलर्क्ष केल तर काय घडू शकत हे त्याला समजत आणि ते सार समजल्यावर
तो पुन्हा नॉर्मल होतो आणि ज्या चुका स्वप्नात केल्या त्या प्रत्यक्षात करायच्या नाही
हे ठरवतो आणि एक सुखी वैवाहिक आयुष्य जगतो ,,,
धुंदीत तो डायरेक्ट लग्न मग लगेच हनिमून
लगेच पुढच्या दोन वर्षात तो केम्ब्रिजला जातो त्याला आणि मुलगा होतो
कामाच्या गडबडीत त्याच घरात नेहमी प्रमाणे लक्ष नसत
फक्त तो आणि तयच काम त्याची बायको उत्तम चित्रकार असते
पण दोन मुलांच्या नादात तीच सार हरवून बसते त्यातच तिची कलेची कदर करणारा
एक दुसरा जोडीदार तिला भेटतो त्यातच हिरोची आई मरते
मुलगी मुलगा मानेनासे होतात त्यांचा डिवोर्स होतो तरीही त्याला अक्कल आलेली नसते
त्याची आई मरते तेव्हा सारे नातेवाईक जमा होतात आणि तिथे त्याला
समजत अरे आपल्या बायकोने तर दुसरा नवरा केला वयाच्या साठाव्या वर्षी ,,
आणि स्वप्नातच त्याला भान येत सारा खेळ त्याच्या लक्षात येतो
आणि हातातल ते बंधन जे भटजीने बांधलेलं असत
जे त्याला सावध करत तो ते बध्न तोडतो
पुन्हा स्वप्नात साठव्या वर्षी पोहचलेला तो सारा
गुंता का जाहला तो सोडवत सोडवत मागे येतो भानावर येतो
आणि सिनेमा असल्या मुळे डायरेक्टर त्याचा फायदा योग्य तो घेतला आहे
सुधारलेला हिरो दाखवत सिनेमा हेपी एंड केला आहे ,,,,
आणि हो त्यातल i love you खूपच मस्त ,,
सिनेमात ती हिरोईन बरेचदा लाडे लाडे त्याला आय लव यु म्हणते तो हि मग आय लाव यु म्हणतो मग ती विचारते क्यू?
त्यावर बरेचद तो वेगवेगळी उत्तर देतो 
आणि स्वप्नातून जेव्हा तो जागा होतो आणि वर्तमानात येतो 
पुन्हा धावत पळत जातो हिरोईन कडे 
हातपाय जोडतो मस्का लावतो आय लव यु म्हणतो ती पुन्हा विचारते क्यू?
त्यावर तो खूप सुंदर उत्तर देतो तो म्हणतो ख्यू कि ,,,
तुम मेरा बिता हुवा कल हो ,,
तुम हि मेरा भविष्य हो 
और आज जी रहा हु पल भी तूम ही हो,,,
लग्नाच्या सात फेर्यांमध्ये हेच तर अपेक्षित असत 

तात्पर्य -आयुष्याला जीवनाला झालेल्या  चुकांना 
दुरुस्त करण्याचा बदलण्याचा अधिकार मात्र आपल्याला  नाही त्याला रिव्हर्स गियर नाही,,
त्यामुळे अनुभवातून शहाणपण हाच एकमेव मार्ग उरतो,,
आणि अनुभव वो कंघी हे जो गँजा होणे के बाद मिलती है
आणि वेळ निघून गेली की
मिळालेल्या कंघीचा काही एक उपयोग नसतो,,
आयुष्यातील छोटे छोटे क्षण जर जगलो नाही आपल्या जोडीदारा सोबत तर काय पदरी पडत ते पाहण्यासाठी हा चित्रपट पाहावा,,
स्माल मिळते जाव लार्ज बनते जाव 
ILU खूप छोटा शब्द पण खरा अर्थ समजून घायचा असेल तर हा चित्रपट पहा,,
आपल्या लोकांचे छोटे छोटे कार्यक्रम
मग ते अगदी आपल्या मुलांचे वाढदिवस असतील किंवा शाळेतील
पालक दिनाला उपस्थित राहन असेल,, आपल्या मुलांची इयत्ता किमान माहीत नसेल ,,त्यांची शाळेची
तयारी कधी केली नसेल,, म्हणून हा चित्रपट पहा  .                      
शाळेत जाऊन शिक्षकांशी मुलाच्या मुलीच्या बाबतीत कधी केलंच नसेल,,म्हणून हा चित्रपट पहा .
फक्त काम आणि आणि आराम आणि बायकोला मुलाला गृहीत धरण म्हणजे संसार नव्हे 
हे ज्यांना समजून घ्याच असेल त्यांनी हा चित्रपट पाहावा 
नक्की पहावा 
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर



Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...