Skip to main content

या पुढे माझ्या पगारातले पाच रुपये कमी करा ,,,,

हि गोष्ट आहे लाल बहादूर शास्त्री यांची
पंतप्रधान व्हायच्या आधीची त्यावेळी ते कोंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते त्यावेळी त्यांना साठ रुपये पगार होता
एके दिवशी अचानक एक त्यांचा मित्र त्यांच्या घरी आला
आणि त्यांना म्हणाला शास्त्रीबुवा मला रुग्णालयाच्या खर्चा पोटी साठ रुपायंची
अत्यंत गरज आहे जर तूम्ही मला मदत कराल
तर तुमचे खूप उपकार होतील
त्यावर शास्त्रीजी म्हणाले मित्रा
मला तुला मदत करायला खूप बर वाटल असत पण
आज आहे दहा तारीख आणि माझा पगार होतो एक तारखेला
आणि मी माझा सारा पगार माझ्या बायकोच्या हातात देतो
आणि त्यातही मला पगार नेमका साठ रुपये आहे तेच तुला
दिले तर माझ्या हाती काय उरेल
आणि या पगारात तुला काय देणार
ठीक आहे येतो मी अस म्हणत जाणार तोच
शास्त्रीजींच्या सौ पुढे आल्या आणि शास्त्रीजींना म्हणाल्या
माझ्या कडे साठ रुपये आहेत ते त्यांना द्या
तुमच्या मित्राची गरज भागेल आणि तुम्हाला तुम्ही त्याला
अडीअडचणीला मदत केली म्हणून विसरणार हि नाही
शास्त्रीजींनी ते साठ रुपये आपल्या बायकोकडून घेतले
आणि मित्राला दिले
मित्र त्यांचे आभार मानत निघून गेला
त्यानंतर शास्त्रीजींनी आपल्या बायकोला विचारले
हे साठ रुपये तू कुठून आणलेस?
त्यवर त्या म्हणाल्या तुम्हाला जो साठ रुपये पगार मिळतो
सेक्रेटरी झाल्या पासून गेले वर्षभर
त्यातील मी खर्चाची काटकसर करून दर महिना पाच रुपये
बाजूला ठेवत होते त्यातलेच हे साठ रुपये
शास्त्रीजी त्यावेळी काही बोलले नाही पण
दुसऱ्या दिवशी कोंग्रेस कमिटीला त्यांनी पत्र लिहिले
या पुढे माझा पगार पंचावन्न रुपये करावा माझ त्या भागत
त्या मुळे माझ्या पगारातले पाच रुपये कमी करावेत
व त्यातून समाजोपयोगी कामे करावीत
तात्पर्य --
आपली गरज ओळखून त्यानुसार आणि तितकाच खर्च करावा
अर्थात हि गरज ओळखून वागणारे शास्त्रीजी कुठे आणि
आजचे नेते कुठे? 
हि गोष्ट खोट्या आदर्शाचा आदर्श ठेवणार्यांना कदाचित अतिरंजित वाटेल
पण नीती आणि मूल्य ज्यांना कशाशी खातात
हे माहित नाही त्यांना काय कळणार,,,,,,,,,,,,?


Comments

  1. सुनील,त्यांची जी कर होती (अम्बास्सादोर क्रमांक...

    Ganesh Date
    6:57pm Jun 13
    सुनील,त्यांची जी कर होती (अम्बास्सादोर क्रमांक ६ ,पांढर्या रंगाची, ती बँकेकडून कर्ज घेवून घेतली होती.शास्त्रीजी गेले त्या वेळी ते कर्ज बाकी होते. खरा पाहता शास्त्रीजी म्हणजे इक पैसा न कमावणारा मूर्ख देशप्रेमी होते असा म्हटल्यास चूक ठरू नये.कारण आज कोणाचा कोण जावई राशींवर लोळत आहेत.आज शास्त्री असत तर त्यानी स्वतःला गोळी मारून घेतली असती.पहिल्यांदा ते जेव्हा मंत्री झाले तेवान्हा बांधकाम विभागाची माणस त्यांच्या घरी वातानुकुलीत यंत्रणा बसविण्यास त्यांच्या घरी गेले,शास्त्री उत्तरले मला याची गरज नाहीं , बाकीच्या लोकांना पंख पुरतो मग मलाही तोच पुरेल.आणि आज तो गल्लीतला भड भून्जा नगर सेवक २००-२५० मतांनी निवडून येतो तर त्याला पोळीचे एस्कॉर्ट लागतो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल