Skip to main content

गांधील माशी,हिंसक गिधाड आणि पराक्रमी हिंदू

आज एक छान गोष्ट वाचली
फार फार वर्षांपूर्वी या भरत वर्षात दुष्काळ पडला
सारे लोक आप-आपले गाव सोडून ईतरत्र निवारा शोधण्यासाठी जात पण आसरा कुठे ते मिळत नसे पण याच भरतपुरातील एक शेतकरी मात्र रोज नित्यनेमाने आपल्या शेतावर जावून शेताची नांगरणी करीत असे अर्थातच लोक त्याला वेड्यात काढत असत काय पण मूर्खपणा पावूस नाही पाणी नाही तुझ्या बैलांना आणि स्वतःला त्रास का रवून घेतोस आणि देतोस?
पावूस पाणी नसताना शेत नांगरणे तुला काही कळते कि नाही?
लोक म्हणत पण त्याच काम नित्य नेमाने चालतच होते
एखाद्या गवयाने रोज रियाझ करावा ,किंवा खेळाडूने सराव करावा
एकंदर त्याच काम तसच चालू होत
लोक हसत कुचेष्टा करत पण तो शेतकरी आपल्या कामाला चुकत नसे ,,

एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्या गावातून चालले होते
तर चालता चालता माता लक्ष्मी त्या शेतकर्याला पाहून थबकली
भगवान विष्णूचेहि लक्ष गेले ,,पाहतो तो काय ?
तो शेतकरी त्या दुष्काळग्रस्त परीस्थितीतहि शेताची नांगरणी करत होता,
ते पाहून भगवान विष्णूंनीहि त्याला विचारले ,,
काय शेतकरी दादा गावात पाण्याच एक टिपूस उरला नाही तरी शेताची नागरणी करत आहात?
त्यावर शेतकरी म्हणाला ,,,
"हे बघा दादा तुम्हाला काय वाटतय ते मला कळत पण
या वर्षी दुष्काळ पडला म्हणू मी जर नांगर चालवयाचा तसाच ठेवला
तर उद्या मी आणि माझी बैल शेत नांगरायचं विसरून जावू ,,
आणि पावूस काय आज नाहीत उद्या नक्कीच पडेल ,,
मी जर शेत नांगरायला विसरलो तर कसे चालेल,,,?

काय आहे दादा कुठल्याही गोष्टीची माणसाला सवय ,सराव, अभ्यास हा करायलाच हवा त्यामुळे आपण कायम सज्ज राहतो ,येणर्या कुठल्याही संकटाला तोंड देवू शकतो,
पावूस पडेल मग नांगरणी करू असे म्हणू कसे चालेल,,,?
ते मग आग लागल्यावर विहीर खणण्या सारखे होईल,,,

कुणास ठावूक पावूस पावूस कधी पडेल?
हे त्याच बोलन ऐकून माता लक्ष्मी म्हणाली शेतकरी दादा तुम्ही योग्य तेच करत आहत,,,
माणसाला एखाद्या गोष्टीचा अभ्यास असं सराव कारण हेच बरोबर आहे,
त्यावर माता म्हणाली स्वामी तुम्ही सुद्धा बरेच दिवसात
आपला आवडता प्रिय शंख वाजवला नाहीत तो वाजवायचा तर
विसरले नाहीत ना?
कारण आपण शंख वाजवलात कि वरुण राजा पर्जन्यवृष्टी करतो
हे मला पक्के ठावूक आहे ,,,,
आपण शंख वाजवायला विसरलात तर नाही ना बघा जरा तो शंख वाजवून,,,
त्यामुळे येथला दुष्काळ जाईल आणि पावूस पडेल आणि आपल्याला हि कळेल शंख वाजवता येतो कि नाही ते,,,,
आणि मग अर्थातच भगवान विष्णूंनी शंख वाजवला
आकशात ढगांची एकच गर्दी झाली विजा कडाडल्या आणि
बघता बघता थंडगार वारे वाहू लागले आकाशातून पडणार पाणी धरती
धरती आपल्या पोटात रिचवू लागली ,झाड झुडप सुखावली पावूस पडला ,,
आनंदी आनंद झाला आणि ते केवळ शेतकऱ्याच्या
जागरूकतेमुळे हि किमया घडली ,,,,

तात्पर्य --आणि लक्षात आल आपणही आपल्या
पराक्रमी पूर्वजांना विसरलो त्यांचे पराक्रम विसरलो
आणि त्यामुळे आपणही किती पराक्रमी वंशाचे वारसदार आहोत हे हि विसरलो स्वतः किती पराक्रमी आहोत ते विसरलो कारण,,,,
हिंसक गिधाडांच्या प्रेमात बुडालेल्या  अ-हिंसक गांधील माशांनी आम्हाला वारशात ,
सहनशीलता ,सहिष्णुता,आणि एक भेकडपणा दिला आहे
पण एक विचार करा,
आम्ही खरेच जर अ-हिंसक भेकड असतो तर,,,,
--जिजाबाई साहेब यांनी घरात बसूनच "राष्ट्र मुक्त" करणारा पुत्र घडवला,
मुसलमान वरचढ असतानाही,
--छत्रपतींनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला
--शाहीस्त्यखानची लाल महालात घुसून बोट कापली,
--झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी गंगाधर पंताच्या मृत्यू नंतर
गरज पडल्यावर रणांगणावर उतरून इग्रजांशी दोन हात केले 

--पानिपतावर मराठा लढला केवळ दिलेल्या शब्दाखातर ,
--हनुमातला ताकदीची जाणीव झाल्यावरच तो लंका पार झाला
--समुद्र वाट देत नाही बघताच शांत रामांनी धनुष्याला प्रत्यंचा लावताच मार्ग मोकळा झाला
--द्रौपदीने आपले मोकळे केस दुष्शासनाच्या रक्तानीच धुवून बांधीन म्हणून प्रतिज्ञा केल्यावरच महाभारत घडले
--सीतेनी राम स्वत: येवून रावणाला शासन करून मला येथून घेवून जातील तेव्हाच मी लंकेतून येईन हा हट्ट धरला म्हणून रामायण घडले
अशी बरीच जंत्री देता येईल आपल्या पराक्रमी लोकांची
मग आज हिंदू असा मार खाताना का दिसतोय ? कारण
आम्हाला आमच्या स्वपाराक्र्माची जाणच राहिली नाही
रस्तो रस्ती गल्लोगल्ली ,वृत्तपत्रात ,दूरदर्शनवर सगळीकडेच
हिंदू कसा मार खातो त्याच चित्र दाखवलं जातंय
केवला हिंदूंना त्यांच्या स्वत्वाची जाणीव नाही म्हणूनच

ओवेसी सारखी गांडूळ माजलेल्या बैलासारखी अंगावर येताना दिसत आहेत आज उणीव आहे ती आमच्यातला हनुमंत फक्त जागा करनार्यांची,,
त्याला ताकदीची जाणीव करून देणार्यांची ,,
त्याला स्वपराकामाला उद्युक्त करणार्यांची ,
आज महाशिरात्रीच्या निमित्ताने हिंदुनो तुमच्या ताकदीचा
तिसरा नेत्र कधीहि उघडू शकतो याची जाणीव ठेवा बस तो उघडा
ठेवायची तयारी ठेवा लक्षात येईल
कुणाची माय व्याली नाही तुमच्या कडे वाकडा डोळा करून पहायची 



Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल