Skip to main content

स्पेशल २६ --चोर पोलिसांचा खेळ ,

काल परवा पुण्यात होतो तेव्हा स्पेशल २६ पाहण्याचा योग आला
अत्यंत सुंदर सिनेमा
देशाच्या चार कोपर्यात विखुरलेले चार चोर त्यांची हि कथा ,अक्षय कुमार ,अनुपम खेर
राजेश शर्मा आणि किशोर कदम एकत्र येवून सीबीआय अधिकारी
आहोत असे भासवून दिल्लीतील एका मंत्र्याला लुटतात
आणि सुरु होतो चोर पोलिसांचा खेळ ,,,
अर्थातच घरात सापडलेला सारा काळा पैसा हे सीबीआय अधिकारी
लुटून नेतात आणि नेत्यावर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायची पाळी येते.
अर्थातच हि बातमी खर्या सीबीआय पर्यंत पोहचते
आणि सुरु होतो तपास ,,,,
"वेनस्डे" सारखा मास्टरपीस सिनेमा देवून स्पेशल २६ ने त्यावर कडी केली आहे
वेनस्डे मध्ये सरकारच्या नाकर्तेपणामुळे सदैव दहशतीत वावरणाऱ्या सामान्य
माणसाची व्यथा नीरज पांडे ने मानाडली होती.
आणि आता हि खर्या घटनेवर आधारित स्पेशल २६
२५ वर्षापूर्वी सीबीआयच्या एका नकली टीमने एका पेढीवर नकली छापा
टाकून मोठी लुट मिळवली होती
त्यावरच नीरजचा हा सिनेमा आहे
यात हि चार जण थेट मंत्र्याच्या बंगल्यात घुसून त्याचे करोडो रुपये लुटून नेतात
वर मंत्र्याचा कानाखाली हि जाळ काढतात.
आणि आपण गुंतून जातो सिनेमाची पार्श्वभूमी माहित असूनही
पुढे काय होणार ते कळत नाही यातच या सिनेमाच यश लपलेलं आहे
हे चोर चोरी न करता आपल मनोरंजन करत आहेत असच सतत वाटत राहत 
आणि शेवटची चोरी तर एकदम भन्नाट ,,,,
ज्या जिमी शेरगीलवर आपण आणि पोलीसही विश्वास ठेवून असतात
तोसुद्धा फिरतो तेव्हा तर आपण बसल्या जागी उडतो
अशी काही कलाटणी सिनेमाला मिळते इ विचारू नका
ते सिनेमात पाहणच योग्य होईल ,,,
अरे हे काय चालले आहे हे स्वतःलाच विचारतो
आणि रह्स्यातून आपण स्वतःला कसेबसे सावरतो आणि
बिनबोभाट सारे आपापल्या गावी निघून जातात
२५ वर्षापूर्वीच्या गाड्या ,फोन ,रस्ते ,असे छोटे छोटे बारकावे छान दाखवले आहेत
अनुपम ,अक्षय यांच्यावरच सारी अभिनयाची मदार होती
आणि त्यांनी टी लीलया पेलली आहे
खटकेबाज संवाद ,मंत्र्याच्या सणसणीत कानाखाली मारण हे
प्रसंग सिनेमाचे हायलाईट आहेत
आणि
आणखी काय सांगू सिनेमा आवर्जून पहाच..
पण चांगल्या सिनेमात एका मराठी नटाच झालेलं अवमूल्य मनाला नाही पटत
मराठी नटालाच अक्कल नाही आपण तरी काय करणार?


Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल