Skip to main content

कौल मनाचा अर्थात छापा कि काटा

दुपारी टीव्ही लावला आणि नेमक गाण लागल रामपूर का लक्षुमण मधल
"प्यार का समय कम है जहां लडते है लोग कसे वहां ?
क्यू मेरे यार हा मेरे यार क्या बात काही दे ताली,,,,"आणि ,,
मघाशी मला एक मेल आला माझ्या मित्राचा कि त्याला नोकरीची गरज आहे कुणी काही मदत करू शकेल का?
पण आयटीत नको इंजीनियर आहे मुंबईतच हवी वैगेरे अस बराच काही लिहाल होत,,,,
आणि मलाच माझ्या लहान पणाची मला एक अडचण आठवली आणि आठवले ते आमचे काळेमास्तर ,,,,
त्यांनी जे सांगितले ते आज तागायत विसरलो नाही.
मी आणि माझा मित्र संदेश दोघे जिवलग ( सध्या त्याचा पत्ता नाही)
आम्हा दोघात अगदी शुल्लक कारणावरून मारामारी झाली का तर म्हणे त्याने मला न विचारात माझा डब्बा खाल्ला,,,,
आमचे काळे मास्तर तसे खूप कडक पण मुलांवर त्याचं बारीक लक्ष असे,
काय करतात काय बोलतात आणि तो दिवस जवळ आला जेव्हा मला ग्यादारिंग मध्ये सहभाग घायचा होता
मी एक चांगला गायक होतो ( हा आता भूतकाळ आहे) असो,,
आणि संदेश एक चांगला पेटीवादक होता त्या बाबतीत त्याचा हात धरणार कुणी नव्हत,
आता काय करायचं ? मला गाण गायचं तर संदेशची मदत लागणार आणि आमच तर भांडण,,,,?
बर मदत मागायची म्हणजे ते सार अपमानास्पद वाटत होत ,,
बर दुसरा काही उपायही नाही ,,,
निर्णय घेण अवघड झाल ,,,
ईतर बऱ्याच मित्रांनी काहीबाही सल्ले दिले पण ते पटले नाही.
गाण तर गायचं पण कस काही कळत नव्हत डोक चालत नव्हत.,,,
आणि काळे मास्तर देवा सारखे धावून आले मदतीला ,,,,
मला बाजूला घेतलं आणि विचारलं काय भूमकर गाण गाणार म्हणे ?
मी- हो
मास्तर- पण पेटीच काय? ती कोण वाजवणार संदेशला भेटलास का?
मी-नाही,,,
मास्तर -मग आता काय करणार?
मी- काय करू? तुम्हीच सांगा ?माझ काही डोक चालत नाही...
मास्तर-छापा काटा कर,,
मी- काय सर छापा काटा काय सांगताय? हा काय नवा जादूचा प्रकार आहे का?(मनात म्हणालो)
पण सर पक्के त्यांनी माझ्या मनातल बरोबर ओळखल,,
मास्तर-अरे तू कर छापा काटा हे नाण जादुच आहे,,,,,
माझी आजी नेहमी म्हणायची काही अडचण आली कि छापा काटा करावा हे नाण तिनेच दिल आहे .
हे नाण तुला योग्य निर्णय देईल ,,,
ह हे नाण घे आणि ठराव छापा म्हणजे काय आणि काटा म्हणजे काय?
मी- (मनात चला हे हि करून पाहू) नाण घेतलं. उत्तर ठरवली आणि केला छापा काटा.
छापापपापा ,,,,,,,करत मोठ्याने ओरडलो  माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता .
मास्तर मात्र गालातल्या गालात हसत होते. मला नेमक कळेना हे कस झाल ?
मला काय हव होत हे नेमक या नाण्याला कस कळल?
मास्तर म्हणाले मिळाल ना तुझ उत्तर ?
माझ्या मनात गोंधळ वाढला होता हे कस शक्य आहे ?
माझ्या मनात संदेशची माफी मागून दिलजमाई करावी असेच होते कारण त्याच्या शिवाय
गाण्याला मजाही येणार नव्हती आणि का ईतकी जुनी मैत्री एका शुल्लक कारणावरून तोडावी?
पण पाय उचलवत नव्हता ,,,,,,
मास्तर म्हणाले भूमकर अरे साध आहे उत्तर तूच आधी ठरवल होतस आणि तसाच घडल म्हणून तुला आनंद झाला
बस बाकी विशेष काही नाही हे काही जादुच नाण नाही मी आपल असाच बोलल होतो
तूच ठरवलास छापा आला तर हो आणि काटा आला तर नाही म्हणजेच छापा आला तर
संदेशची माफी मागायची आणि काटा आला तर नाही चालणार नाही माफी हि मागवीच लागेल
चित् भी मेरी पट भी मेरा असच तू ठरवलं होतास आणि तसच झाल,,,,,,
काय झाल तर आनंद होईल ते तू आधीच ठरवलं होतस
तुला तुझ उत्तर मिळाल आहे आता तुला तुझा राग रुसवा गिळून संदेश कडे जावे लागेल,
ईतर वेळी मनात काहीही गोंधळ असेल पण छापा काटा करताना तुम्ही नेहमी मनाच ऐकता
म्हणून आता उरली फक्त अंमलबजावणी उत्तर तर तयार आहेच आता मात्र मागे फिरू नकोस
तुला कौल मिळाला आहे तोही तुझ्याच मनाचा.
तात्पर्य--त्या माझ्या मित्राला आता मी ईतकच सांगेन छापा काटा कर
मनाचा कौल घे. कारण ईतर वेळी मनात काहीही गोंधळ असेल पण छापा काटा करताना तुम्ही नेहमी मनाच ऐकता.
आणि तुमच्या मनाचा थांग तुम्हाला लागतो. बघा असाच छापा काटा तुम्हीही करून बघा
अवघड वाटणारे प्रश्न आपणच कसे चुटकी सरशी सोडवतो

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल