Skip to main content

दारू तीच बाटली बदललेली ,,,,,,

मी गेली काही वर्ष कच्छाला जातो,,,       
येथील मां आशा पुराच्या निमित्ताने साधारण दोन वर्षांपूर्वींची
गोष्ट आहे सहज एका माणसाबरोबर ओळख झाली
आणि गाडीत गप्पा सुरु झाल्या आणि थोड्याच वेळात त्याला एक sms
आला त्यात अस लिहील होत
"हा sms १० जणांना पाठवा तुमच भल होईल वैगेरे वैगेरे
आणि ज्यानी ह्या sms कडे दुर्लक्ष केल त्याचं कस वाटोळ झाल"
 हा sms त्याने मला आवर्जून वाचून दाखवला कारण
हा sms त्याला एका राजकीय पुढार्याच्या मोठ्या मुलाने पाठवला होता ,
मग आमच मग हे कस चुकीच आहे वैगेरे गप्पा सुरु झाल्या ,,,,,,,
झाल त्यानानातर हा विषय मी पूर्णतः विसरून गेलो
पण आज शनिवार सक्काळी सक्काळी मला पुन्हा
असाच sms आला  आणि त्यात सार वरील प्रमाणेच लिहील होत ,
माझ्या स्वभावाला अनुसरून मी त्याल दम वैगेरे दिला रागावलो  हि ,,,,,
आणि अचानक मला माझ्या लहान पणाचे दिवस आठवले
मी लहान असताना संतोषी मत नावाचा सिनेमा खूप प्रसिद्ध झाला होता .
ज्याच्या त्याच्या घरी दरी शुक्रवार पाळण्यात येत होता
मग त्या दिवसाची नवलाई आंबट चिंबट खावू नये वैगेरे वैगेरे,,,,,
लहान होतो त्यातलं गांभीर्य कळत नव्हत 
पण जे काही चालल होत ते खरच खूप चांगल चित्र होत
लोक देवभोळे झाले होते वाईट वागत नव्हते मला तरी ईतकच
कळत होत
आणि एक दिवस आमच्या दारात एक पोस्ट कार्ड आल
उत्सुकतेने उचललं तर त्यावर हि असच लिहील होत
"हे पत्र कमीत कमी दहा जणांना पाठवा तुमच काम होईल
ज्यांनी या पत्राचा अनादर केला त्याचं वाटोळ झाल "
सगळे घरातले घाबरले
घाबरले नाहीत ते माझे वडील,,,,,
त्यांनी ठाम पणे सांगितलं ह्या असल्या खुळचट कल्पनांना
मी बळी पडणार नाही तुम्हालाही पडू देणार नाही
आज ह्या गोष्टीला साधारण तीसेक वर्ष तरी झाली
आमच काही बर वाईट  झाल नाही .
आज नेमका तो sms आला आणि सार चित्र डोळ्या समोरून धावल .
लक्षात ठेवा दहा जणांना sms पाठवून तुमची दुखः कशी कमी होणार?
तुमची बायको जर  घटस्पोट  घेणार असेल तर ती थांबेल कशी?
कुणाच्या मुलाला पोलिओ कसा होईल?
आणि कुणी केलाच sms हा फोरवर्ड तर त्याला गाडी कशी मिळेल?
कुणाला फॉरीन ची  टूर कशी काय घडेल?
पूर्वी हा सारा खेळ मला वाटत पोस्ट कंपनी खेळत असेल
आज मोबाईल वाले हा खेळ खेळत .स्वतःचा धंदा वाढवताना
लोकांना नाहक अंधश्रध बनवत आहेत,
लोकांच्या भावनांशी अस खेळायचा अधिकार कुणी दिला?
एखादा गरीब ज्याच्याकडे हि ऐपत नसेल त्याने काय कराव?
थोडा विचार करूया,
आता आपल्या श्रद्धा आणि भावनांचं हि कुणी तरी मार्केटिंग करतंय
आणि आपण भाबडे पणाने त्याला बळी पडतोय.
पूर्वी पोस्टा मार्फत आता मोबाईल मार्फत .

दारू तीच बाटली बदललेली ,,,,,,
बघा गंमत कशी आहे
१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा *गरिबाला द्यायची असेल**?,** *
पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात .....
३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते ,
पण ३ तासाचा बकवास सिनेमाबघायला सोपे जाते.....
पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही ...
पण आपल्याआईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ......
Valentine Day  ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ शकतो पण Mothers Day ला,,?
१ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ शकत.
हे आणि ते सार sms प्रकरण का होत माहित आहे मित्रानो?
कारण आपण रोज जणून बुजून कुठनं कुठ तरी मुद्दाम चुका करत असतो

त्या चुकांचं परिमार्जन म्हणून ह्या असल्या गोष्टींना बळी पडतो
आणि श्रद्धेला वेठीस धरतो आणि यात बदनाम होतात
आपलेच देव धर्म आणि संस्कृती आपले विचार  
यावर मला एकच सांगावस वाटतंय मित्रांनो तुम्ही फसू नका
आणि कुणाला फसुही देवू नका .



Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल