Skip to main content

देवाची लीला लाकूडतोडया,मुलगा, आणि त्याची बायको

लाकूडतोड्याची गोष्ट तुम्हाला माहितच आहे
विहिरी काठी लाकड फोडताना पाणी प्यायला गेला असता
त्याची कुर्र्हाड विहिरीत पडते गरीब बिच्रा लाकूडतोड्या
मग देवाचा धावा करतो देव येतो आणि
विहिरीत बुडी मारतो आधी सोन्याची,चांदीची अशा
५\६ कुर्र्हडी काढतो लाकूड तोड्या गरीब असला तरी प्रामाणिक असतो
तो त्या कुर्र्हडी नाकारतो आणि सांगतो देवा माझी कुर्र्हाड साधी आहे
त्यामुळे ह्या कुर्र्हडी माझ्या नाहीत .
देव त्याच्या या प्रामाणिक पणावर
खुश होवून त्या सर्व कुर्र्हडी बक्षीस देतो
गरीब लाकूड तोड्या श्रीमंत होतो,,,,,,,,,
त्याच लाकूड तोड्याचा मुलगा आपल्या बायकोला घेवून एकदा गावी येतो .
आणि मग परत ते जुने दिवस आठवले जातात
त्या मुलाच्या बायकोला हे सर्व ऐकल्यावर ती विहीर पहायची
ईच्छा होते ज्या मुळे आपल्या सासरची भरभराट झाली,,,
नवर्या कडे ती हट्ट धरते ती विहीर मला दाखवा
मुलगा ती विहीर दाखवायला घेवून जातो   
'अय्या किती खोल आहे 'असे म्हणत असतानाच 
जाउन ती विहीरीत पडते.
आता देवाचा धावा करण्याची पाळी लाकूडतोड्याच्या मुलाची असते !
देव हि लगेच भक्ताच्या हाकेला ओ देतो
देव व्हीरीत बुडी मारतो आणि ,,,,,?
बिपाशा बसूला बाहेर काढतो आणि ही का तुझी बायको ?
असे विचारतो. आणि क्षणाचा हि विलंब न लावता
हो अशा अर्थाने माना हलवत राहतो व शेवटी निर्धाराने "हो" म्हणून सांगतो !
देव अर्थातच
संतापून म्हणतो
 कलीयुग कलीयुग म्हणतात ते हेच !
कोठे तुझा बाप आणि कोठे तू, ??????
या item girl ला आपली बायको म्हणून सांगतोस ! !!
थांब तुला शापच देतो !
मुलगा धावत देवाचे पाय धरून आपले म्हणणे पूर्ण ऐकून तरी घ्या म्हणून विनवतो.
"
देवा, तुमची ही जुनीच खोड आहे,
तुम्ही आधी बिपाशा, मग करीना आणि शेवटी माझी लग्नाची बायको बाहेर काढली असतीत,
माझ्या प्रामाणिक पणाला भूलून तुम्ही या दोन फटाकड्यापण माझ्या गळ्यात बांधल्या असतात.
अहो पूर्वीचे दिवस नाही राहिले देवा, तुम्ही माझ्या गळ्यात ४\४ बायका माराल
पण 
कायद्याने याला बंदी आहे वर
या महागाईच्या काळात एक बायको सांभाळणे जड जाते तर तीन चार
सांभाळताना माझे तीन-तेराच झाले असते.".

हा खुलासा देवाला पटतो आणि बिपाशा बरोबर तो अदृष्य होतो.
बराच वेळ थांबून देव आपल्या मूळ बायकोला पण वर आणत नाही असे बघून
"
देवाची लीला अगाध आहे" असे म्हणत तो एकटाच घरी परततो

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल