Skip to main content

पतंगाच्या प्राक्तनाची कथा ,,,,काईट्स

एक प्रेमकथा
बॉलीवूड मधील घराण्यांनी आता पर्यंत अनेक हिरोंना मोठ करण्यासाठी 
भव्य दिव्य प्रेमकथा काढल्या ,,,
पण काईट्स,,,,,,,,,,त्याहून खूप वेगळा असा सिनेमा आहे .
असे नाही पण तरी सुद्धा हि आजची प्रेमकथा आहे ,
हे प्रेम देश, भाषा, धर्म,या सर्वांची सीमा ओलांडून 
खर प्रेम दशांगुळे वर उरत हे अनुराग बसूने अत्यंत उत्तम रित्या सांगितलं आहे .
लासवेगात साल्सा नृत्य शिकवून फावल्या वेळात 
बेकायदा अमेरिकेत आलेल्या मुलीं सोबत (ग्रीन कार्ड साठी)
लग्न लावायचा व्यवसाय करणाऱ्या "जे" (ह्रितिक रोशन)
या हरफान मौला वृत्तीच्या तरुणाची आणि ,,,,,
आपल भल मोठ्ह कुटुंब  पोसण्यासाठी पैसे कमवण्याच्या उद्देशाने 
मेक्सिको मधून बेकायदेशीर रीतीने अमेरिकेत येवून 
टोनी( निकोलस ब्रावून) या कसिनो मालकाच्या मुलाशी लग्न करणाऱ्या 
नताशा उर्फ लिंडा ( बार्बरा मोरी),,,
यांची कथा ,,,
हॉलीवूडला टक्कर देईल अस या बोलीवुडी प्रेमकथेत दम आहे 
यात जे वर प्रेम करणारी जिना आहे (कंगना)
टोनीचा बाप कबीर बेदी आहे  ,,
तर अशा ह्या जे च्या प्रेमात कबीर बेदीची मुलगी पडते आणि जे हि तिची श्रीमंती पाहुन 
त्याला तयारच होणार तोच एक आक्रीत घडत ,,,,
तोच हा प्रेमानुभव म्हणजे  ,,,,काईट्स,,,
अचानक लिंडा त्याच्या समोर येते जिच्याशी त्याने आधी खोटा विवाह केलेला असतो.
पण का कुणास ठाऊक एक हलकेशी प्रेमाची चुणूक सुद्धा अनुभवलेली असते.
तोच तो तरल प्रेमानुभव त्याला पुन्हा अनुभवायला मिळतो ,,,प्रेमानुभव .
पण दुर्दैव ती समोर येते खरी पण ,,,
कबीर बेदीच्या मुलाची भावी बायको म्हणून ,,,
आणि कबीर बेदी मोठ्ठा डॉन असतो,
नियतीला काही वेगळच मंजूर असत तिला हवा असतो ,,,प्रेमानुभव .
आपसूकच मग अव्यक्त प्रेम व्यक्त केल जात ,
अशी काही परिस्थिती निर्माण होते कि दोघांना पळून जाव लागत ,,,,
विदेशातल चित्रण ,हॉलीवूडला टक्कर देणारा हृतिक ,
तितक्याच समर्थ पणे त्याला साथ देणारी लिंडा ,,
सुंदर छाया चित्रण, त्याचा डान्स ,उत्तम लोकेशन्स ,आणि ,,,
त्यात हि प्रेमात आकंठ बुडालेले अंगावर येणारे त्याचे निळे डोळे ,,,
विशेषतः हिरोईन जखमी झाल्यावर 
मित्राच्या सोबतीने तिला बिनधोक परत पाठवायचा केलेला 
केविलवाणा प्रयत्न ,,,, 
ती निघते खरी जायला आणि फिरून मागे बघते 
आपल्याला कळत हि नाही ईतक्यात ती परत येते 
आणि खाडकन (प्रेमाने) त्याच्या कानाखाली लगावते 
आणि आपण समजून जातो तिला त्याला सोडून जायचं  नाही 
आणि त्याला हि तिच्या शिवाय जमायचं नाही 
एक पाचच मिनिटाचा सीन असेल पण 
जान कुर्बान करावीशी वाटते ,,,हाच तो प्रेमानुभव,,,, 
त्यानंतर त्याचं रीतसर लग्न होत ,
पण गुंड येतात दोघेही पुन्हा जीव वाचवून पळतात,
याही वेळी कबीर बेदीचा अंगरक्षक त्याला मदत करतो 
पण तो बराच जखमी असतो लिंडा कशीबशी 
त्याला त्याचा जीव वाचवा 
म्हणून रेल्वेच्या डब्यात बसवते व स्वतः गुंडांना सामोरी जाते 
त्यावेळी त्या डब्याच्या बंद दरवाज्यातून 
हृतिक तिला जी कळवळून हाक मारतो,,,,
लिंडा आआआ ,,, हा प्रेमानुभव ,,,
कसाबसा तो जिवंत राहतो तो आपला मोबाईल शोधतो
आणि दशवातर दुर्दैवाचे पुन्हा सुरु होतात ,
खरतर हिरोईन लिंडा च काय झाल हे येथ पर्यंत आपल्याला ठाऊक नसत. 
येथे हि तो अंगरक्षक त्याला सर्व हकीकत सांगतो .
पण परत सार्या गुंडांकडून तो घेरला जातो 
सार्यांना तो मारतो हि पण प्रेमाच तिसर टोक कंगना ,,,
ती कशी गप्प बसेल ?तीच हि ह्रितिक वर प्रेम असत ,,
त्याची शिक्षा म्हणून ती त्याला गोळी घालते 
पण उत्कट प्रेमाच्या जोरावर ह्रितिक जिवंत राहतो 
कारण त्याला,,,,तो अनुभव घ्यायचा असतो ,,,,,,,?
त्याच परिस्थितीत उठतो गाडी काढतो आणि ,,
जातो त्या ठिकाणी ,,,
जिथून त्याच्या प्रेमिकेने आत्महत्या केलेली असते ,,,
त्याच कड्यावर उभा राहून स्वतःला तोही झोकून देतो ,,,हाच प्रेमानुभव ,,
जात पात भाषा धर्म यांना खर प्रेम अडवू शकत नाही ,,हा प्रेमानुभव ,,,
उत्कट तितकाच उदात्त ,,,प्रेमानुभव ,,
हा प्रेमानुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे ,
ज्यान प्रेम केल आहे ,ज्याला करायचं आहे त्याने ,
आणि ज्याला प्रेम म्हणजे काय ते कशाशी खातात 
ते काळाव म्हणून हि घ्यावा असा ,,,प्रेमानुभव 
आणि पुन्हा मोह आवरत नाही म्हणून सांगतो 
ह्रितिकच्या निळ्या डोळ्यातून प्रेमाची वेदना अक्षरशः बोलते 
म्हणजे काय ते समजण्यासाठी काईट्स पहा ,,,प्रेमानुभव घ्या 
आणि यातली गाणी अरे अन्याय होईल रे ,,,
झींदगी दो पल कि,,,,,झपाटून टाकत प्रेमानुभव म्हणजे काय ते सांगत .
दिल क्यू ये मेरा ,,, प्रेमाचा तरल  अनुभव देत प्रेमानुभव .
आणि सुरवातीचा कंगना आणि ह्रितिक चा डान्स ,,,
काय बोलावं,,,?
या सार्याचा एकत्रित अनुभव म्हणजे 
ह्रितिक आणि लिंडाचा ,,,काईट्स           
प्रेम म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय नाही कळत ,,तो काईट्स  
प्रेमात स्वतःला अर्पण करण म्हणजे ,,,प्रेमानुभव , 
मग चला तर मग हा अनुभव तुम्हीही घ्या जो मी घेतला 
प्रेमानुभव ............ 

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल