Skip to main content

७४ जणांचे तळतळाट....

मध्ये एकदा 
प्रबोधनकारांची गोष्ट वाचनात आली ,
 
आपणा पैकी कित्येकांना माहित हि असेल कदाचित,
 
असो तर गोष्ट अशी ,,,
 
केशव सीताराम ठकारे ,म्हणजेच प्रबोधनकार ,
 
त्यांच्या तरुण पणी त्यांनी एकदा लॉटरीच एक तिकीट काढल.
 
आणि कर्मधर्म संयोगाने ते लागल हि ,,,
 
गावात बातमी पसरली अरे ठाकरेंना लॉटरी लागली.
 
जो तो ठाकरेंच अभिनंदन करत होता
 
कारण मिळालेली रक्कम हि खूप मोठी होती
 
आज कदाचित ती तुम्हाला कमी वाटेल
 
कारण आज आपणा सर्वांची मुल त्या लॉट्रीच्या
 
रकमे ईतका पैसा रोज खर्च करतात.
 
तर ती रक्कम होती.
 
एक रुपयाच्या बदल्यात ७५ रुपये
 
हसलात ना..?
 
पण त्याकाळी ७५ रुपयात
 
किमान ६ महिने एखाद्या कुटुंबाचा घराचा खर्च चाले ,,,,,,
 
तर असे ते ७५ रुपये कधी एकदा आईच्या पायावर ठेवून
 
तिची शाबासकी मिळवतो असे ,
 
प्रबोधनकारांना झाले होते ,आणि हि बातमी तो पर्यंत
 
त्यांच्या आईला हि कळली होती ,
 
मुलाची वाट पाहत ती दरवाजात बसली होती ,
 
आणि धावत धावत केशव आला
 
आईची पायावर ते पैसे ठेवणार ,,
 
तोच एखादी वीज कडाडावी तशी ती माउली
 
कडाडली आधी ते सारे पैसे घराच्या बाहेर टाक..........
 
एक रुपयाच्या बदली ७५ रुपये म्हणजे
 
७४ जणांचे तळतळाट घरात आणण्या सारखे आहे
 
तेव्हा ते सारे पैसे आधी बाहेर फेक आणि
 
आणायचाच असेल तर आपला रुपया तेव्हडा घरात आण
 
तर घरात ये.....

लक्षात घ्या जर ७४ रुपयांचे तळतळाट त्या माउलीला भारी वाटले 

की बाबा नको ते पैसे आपल्या घरात जर ७४ जणाचे तळतळाट 

नको मग या सर्व नेत्यांच्या घरी किती जनांचे तळतळाट 

जात असतील,,,,,,,,,,?  
 
तात्पर्य-   
 
से संस्कार देणारी आई परत महाराष्ट्रात नाही झाली नाही 
 
म्हणून तर
 
नार्या,चव्हाण,पवार,कलमाडी सारखी औलाद जन्माला आली.

सध्या राष्ट्रकुलचे पडघम वाजून बंद होण्याच्या मार्गवर आहेत. नव्हे ते होतीलच यात शंका नाही.
चौकशी समितीचे फार्स बसतील,दावे प्रति दावे होतील .
टिशू पेपर म्हणे १०००० चा होता यावर मी पामर काय बोलणार?
आणि कॉंग्रेसचा आदर्शवाद काय, 

महाबळेश्वरची जमीन घोटाळा काय ,
अशोकाचे झाड काय , नारायण राणे काय ,विलासराव काय आणि 
सर्वांचे मुकुट शिरोमणी ,श्री शरदचंद्र पवार काय वाह क्या बात है,  
यांचे भ्रष्ट पायावर बांधलेले कायदेशीर ईमले
सारे एकसे बढकर एक,,त्यांचे बिल्डर पूजन सुरस कथा तरी सांगायच्या 

सिंदबादच्या सफारी,हातिमताई ,चांदोबा,वेताळ पंचविशी,
 
पंच तंत्र ,अकबर बिरबल सारे यांच्या बुद्धीमत्ते पुढे फिके आहेत
 

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल