Skip to main content

७४ जणांचे तळतळाट....

मध्ये एकदा 
प्रबोधनकारांची गोष्ट वाचनात आली ,
 
आपणा पैकी कित्येकांना माहित हि असेल कदाचित,
 
असो तर गोष्ट अशी ,,,
 
केशव सीताराम ठकारे ,म्हणजेच प्रबोधनकार ,
 
त्यांच्या तरुण पणी त्यांनी एकदा लॉटरीच एक तिकीट काढल.
 
आणि कर्मधर्म संयोगाने ते लागल हि ,,,
 
गावात बातमी पसरली अरे ठाकरेंना लॉटरी लागली.
 
जो तो ठाकरेंच अभिनंदन करत होता
 
कारण मिळालेली रक्कम हि खूप मोठी होती
 
आज कदाचित ती तुम्हाला कमी वाटेल
 
कारण आज आपणा सर्वांची मुल त्या लॉट्रीच्या
 
रकमे ईतका पैसा रोज खर्च करतात.
 
तर ती रक्कम होती.
 
एक रुपयाच्या बदल्यात ७५ रुपये
 
हसलात ना..?
 
पण त्याकाळी ७५ रुपयात
 
किमान ६ महिने एखाद्या कुटुंबाचा घराचा खर्च चाले ,,,,,,
 
तर असे ते ७५ रुपये कधी एकदा आईच्या पायावर ठेवून
 
तिची शाबासकी मिळवतो असे ,
 
प्रबोधनकारांना झाले होते ,आणि हि बातमी तो पर्यंत
 
त्यांच्या आईला हि कळली होती ,
 
मुलाची वाट पाहत ती दरवाजात बसली होती ,
 
आणि धावत धावत केशव आला
 
आईची पायावर ते पैसे ठेवणार ,,
 
तोच एखादी वीज कडाडावी तशी ती माउली
 
कडाडली आधी ते सारे पैसे घराच्या बाहेर टाक..........
 
एक रुपयाच्या बदली ७५ रुपये म्हणजे
 
७४ जणांचे तळतळाट घरात आणण्या सारखे आहे
 
तेव्हा ते सारे पैसे आधी बाहेर फेक आणि
 
आणायचाच असेल तर आपला रुपया तेव्हडा घरात आण
 
तर घरात ये.....

लक्षात घ्या जर ७४ रुपयांचे तळतळाट त्या माउलीला भारी वाटले 

की बाबा नको ते पैसे आपल्या घरात जर ७४ जणाचे तळतळाट 

नको मग या सर्व नेत्यांच्या घरी किती जनांचे तळतळाट 

जात असतील,,,,,,,,,,?  
 
तात्पर्य-   
 
से संस्कार देणारी आई परत महाराष्ट्रात नाही झाली नाही 
 
म्हणून तर
 
नार्या,चव्हाण,पवार,कलमाडी सारखी औलाद जन्माला आली.

सध्या राष्ट्रकुलचे पडघम वाजून बंद होण्याच्या मार्गवर आहेत. नव्हे ते होतीलच यात शंका नाही.
चौकशी समितीचे फार्स बसतील,दावे प्रति दावे होतील .
टिशू पेपर म्हणे १०००० चा होता यावर मी पामर काय बोलणार?
आणि कॉंग्रेसचा आदर्शवाद काय, 

महाबळेश्वरची जमीन घोटाळा काय ,
अशोकाचे झाड काय , नारायण राणे काय ,विलासराव काय आणि 
सर्वांचे मुकुट शिरोमणी ,श्री शरदचंद्र पवार काय वाह क्या बात है,  
यांचे भ्रष्ट पायावर बांधलेले कायदेशीर ईमले
सारे एकसे बढकर एक,,त्यांचे बिल्डर पूजन सुरस कथा तरी सांगायच्या 

सिंदबादच्या सफारी,हातिमताई ,चांदोबा,वेताळ पंचविशी,
 
पंच तंत्र ,अकबर बिरबल सारे यांच्या बुद्धीमत्ते पुढे फिके आहेत
 

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...