Skip to main content

गुजारीश ,,,,,दया मरणाची ,

अर्थात मृत्यूच सेलिब्रेशन
ह्रितिक रोशनचा आणखी एक नितांत सुंदर सिनेमा
मध्यंतरी अरुणा शानभाग चा विषय पुन्हा 

एकदा गाजला होता .
के ई एम रुग्णालयात आहे ती आहे आजहि,
दया मरणाची 

ईच्छा धरून असलेली पण नाही ,,,,,,
आज हि ती 

तिने न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतेय
आणि नराधम सोहनलाल वल्मिकि १९७३ 
साली याने
अरुणा शानभाग वर बलात्कार केला
केवळ ७ वर्षाची सजा भोगून हा पठ्या सुटलाही,,,?
आज तो कुठे तरी दिल्लीत
कुठल्याशा दवाखान्यात च आहे म्हणे ,,
त्याच्यावरील 

आरोपत बलात्काराचा उल्लेखही नव्हता
या ३६ वर्षात १९७३ ते २००९
के इ एम चे ७ डीन बदलले
भोइवाड्याचे पोलिस बदलले,अधिकारी बदलले,
नर्सेस बदलल्यापण अरुणा ला न्याय मिळाला नाही ,,,?

असाच काहीसा वेगळा विषय घेवून आला 
आहे गुजारीश,,,,,सरकार दरबारी तो हि दया मरणाची इच्छा प्रदर्शित करतो .
आणि ती मागणी करताना अगदी जोरका झटका हि देतो
प्रतिपक्षाच्या वकिलाला केवळ ६० सेकंद जादूच्या पेटीत बसायला लावतो
आणि तो वकील एक मिनिट हि बसू शकत नाही .
त्यावर तो म्हणतो,
"माझ्या आयुष्याची ६० सेकंद हि तुम्ही जगू शकत नाही ?"क्या बात है.....
मध्यंतरी पुण्यात गेलो होतो 

तेव्हा हा सिनेमा पाहण्याचा योग आला
काईट्स नंतर आणखी एका सुंदर 

सिनेमाची मेजवानी तो देतो आणि 
अंतर्मुख करतो विचार करायला प्रवृत्त करतो,
गोव्यात राहणारा जादुगार एथन मस्करेहांस (ह्रितिक)
सध्या अपंगत्वामुळे  रेडीओ जॉकीच काम करत असतो.
अपंग होवूनही ईतरांच्या मनाची  जिद्द वाढवायचं काम तो करत असे
श्रोत्यांना तो क्षणात हसवे क्षणात रडवे.
आणि अचानक एका क्षणी त्याला जाणीव होते ,,,,
आता आपला एकेक अवयव निकामी होवू लागलाय,,,,
हादरतो आपल्या मैत्रिणीला बोलवून तिला न्यायालयात
दयामरणाचा अर्ज करायला लावतो,,,,,,,,
पुढे काय होत,,,,,,,,,?
ते पाड्यावर पाहणे म्हणजेच हि माझीही
तुमच्यापाशी वेगळी गुजारीश ठरेल आवर्जून पहा ,,,
ऐश्वर्या राय साठी ,,,,,,,
एके ठिकाणी हॉटेल मध्ये उडी उडी गाण्यावर ती
बसल्या जागी काय नाचलीय बाप्रेपाब,,,,,,,,
बघितलीच पाहिजे,,,,,,
तो अलिशान वाडा,,,,,,
त्याच्या मैत्रिणीची हि केस लढताना होणारे घालमेल,,,,
त्याच्या डॉक्टर ची होणारी उलघाल ,,,,
तो उमद्या स्वभावाचा निरागस जादू शिकायला आलेला मुलगा,,,,,
आणि आपल्याला ज्याच्या मुळे अपंगत्व आलय त्याच्याच
मुलाला जादू शिवणारा ह्रितिक,,,,,,
ह्रितिकच्या अपंग पणाचा अनुभव घेण्यासाठी,,,
त्याच्या निळ्या डोळ्यांच्या जादूसाठी,,,
त्याचे ते डोळे आपल्याशी कसे बोलतात ते अनुभवण्यासाठी ,,,,,
त्याच्यातला जादुगार पाहण्यासाठी,,,,,

सुंदर छाया चित्रण, त्याचा डान्स ,उत्तम लोकेशन्स ,आणि ,,,
त्यात हि प्रेमात आकंठ बुडालेले अंगावर येणारे त्याचे निळ डोळे ,,,
आणि जादू शिकवताना त्या दुसय्रा मुलाच्या हातून अचानक
ह्रितिक खाली पडतो तोल जातो आणि ज्या आर्ततेने सोफियाला हाक मारतो कि ,,,,
आता हि तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहातो,,,,,,,
छत नेमक जेव्हा नेमक त्यच्या कपाळावरच गळत राहत
आधी मोठ्या हिमतीने त्या पाण्याच्या थेम्बाना उडवून लावतो
पण एका अपंग माणसाची ताकद ती काय,,,,,,,,,?
एके ठिकाणी सोफियाचा नवरा तिला त्याच्या समोर
मारहाण करतो आणि एखा क्षणी वाटत आता ह्रितिक सारी ताकद
लावून उठेल आणि सोफियाच्या नवर्याच्या मुस्कटात हाणेल ,पण
डायरेक्टर संजय लीला त्या सीनचा हिंदी सिनेमा नाही बनवत,,,,,,
इकडे न्यायालय त्याचा अर्ज फेटाळत .
तिकडे सोफिया नवर्या विरुध्द न्यायालयात जिंकते
आता ठरवलेला शेवट जवळ येतो आणि साजर होत
मृत्यूच स्वागत सेलिब्रेशन ,,,,,,,,,,,,
एकेकाला आलिंगन देत सहज हसत हसत मृत्यूला हि तो
आलिंगन देतो,,,,,
हा अभिनेता कुठल्या मातीत बनला आहे तेच कळत नाही.

आणि पुन्हा मोह आवरत नाही म्हणून सांगतो 
ह्रितिकच्या निळ्या डोळ्यातून वेदनेची वेदना अक्षरशः बोलते 
म्हणजे काय ते समजण्यासाठी गुजारीश पहा ,,
मग चला तर मग हा अनुभव तुम्हीही घ्या जो मी घेतला 

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल