Skip to main content

सावित्रीची लेक- स्वाती महाडिक.

जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढता लढता वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी. दोन लहान मुलांची आई. कुणाची तरी लेक. कुणाची तरी बहिण, कुणाची तरी भावजय. आणि आता, देशासाठी लढण्याचा निर्धार केलेली भारतीय सैन्याची एक शूर अधिकारी.

कर्नल संतोष महाडिक देशासाठी लढता लढता हुतात्मा झाले, तेव्हा स्वाती दुःखावेगाने चिरडून जरूर गेल्या होत्या, पण त्यांच्या डोळ्यात पेटून उठले होते अंगारे. जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं तेव्हा लाजाहोमाच्या अग्नीला साक्षी ठेऊन त्यांनी पतीला वाचन दिलं होतं की सदैव बरोबर वाटचाल करेन.

गेल्या वर्षी पतीच्या चितेच्या अग्नीला साक्षी ठेऊन, डोळ्यातले अश्रू पुसून त्यांनी संतोषना मनोमन दुसरं वचन दिलं, 'तुमचे राहिलेले काम मी पुरे करेन. तुमच्या जागी मी आर्मीत जाईन. देशासाठी लढेन.'

ते स्वप्न पुरं करणं सोपं नक्कीच नव्हतं. सैन्य भरतीची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असते. त्यात त्यांचं वय त्यांच्या विरुद्ध होतं. सैन्यात अधिकारी म्हणून जॉईन होण्यासाठी जी कमाल वयोमर्यादा असते ती स्वाती महाडिक कधीच ओलांडून गेल्या होत्या, पण संरक्षणमंत्री श्री मनोहर पर्रीकर यांनी भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल दलबीर सिंग यांच्या शिफारसीवरून खास स्वाती महाडिक यांच्यासाठी वयाची अट शिथिल केली.

परीक्षेला बसायची परवानगी मिळाली, पण सैन्यात अधिकारी म्हणून भरती होणं सोपं थोडंच आहे? त्यासाठी शारीरिक, मानसिक अशी सगळीच तयारी लागते. त्यासाठी स्वाती महाडिक यांना खूप कष्ट घ्यावे लागले, खूप त्याग करावा लागला. SSB च्या चाचणीची तयारी व्यवस्थित करता यावी म्हणून त्यांनी काळीज घट्ट करून मुलांना बोर्डिंग स्कूल मध्ये घातलं. लहान असली तरी मुलं ही वीराचीच मुलं. त्यामुळे त्यांनी आईला समजून घेतलं. दिवस-रात्र मेहनत करून स्वाती निवड प्रक्रियेत यशस्वी ठरल्या, आणि आता चेन्नई येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मध्ये प्रशिक्षणाकरता त्या चालल्या आहेत.

एका सावित्रीने स्वतःच्या पतीच्या आयुष्यासाठी प्रत्यक्ष यमाशी झुंजून त्याला परत आणलं. स्वाती महाडिक आपल्या दिवंगत वीर पतीचं अधुरं राहिलेलं स्वप्न पुरं करण्यासाठी आपल्या दुःखाला आवर घालून आपल्या पतीच्या जागी देशासाठी लढणार आहे. ही खरी सावित्रीची लेक.

- शेफाली वैद्य

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल